Female farmers in india:सन्मान शेतीतील ‘ती’ चा

आज महिलाही शेतात महत्त्वाच्या भूमिका बजावताना दिसत आहेत. शेतीतील रोजगारातही त्यांचा वाटा मोलाचा ठरत आहे. शेतातील महिलांचा सहभाग वाढणे खरेच सकारात्मक म्हणावे लागेल. कारण यामुळे कोणी प्रगतिशील शेतकरी म्हणून पुढे येईल, तर कोणी रोजगाराच्या नव्या संधी शोधत येईल, तर काहींना शेतीपासून नवीन रोजगार मिळेल. महिलांचा शेतीतील सहभाग वाढतोय, मात्र जगण्याचा तिचा दैनंदिन संघर्ष कमी करण्यासाठी राज्य सरकारी योजनांमध्ये प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी सकारात्मकरीत्या दाखवली तरच या अन्नपूर्णांचे सबलीकरण होईल.

शेतातील नांगर स्वतःच्या खांद्यावर मोठ्या कष्टपूर्वक ओढून नेणाऱ्या एका स्त्रीच्या छायाचित्राने सुमारे सात दशकांपूर्वी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. हे छायाचित्र होते, १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीचे. पति निधनानंतर कुटुंब आणि शेतीची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणाऱ्या आदर्शवादी आणि कणखर स्त्रीच्या, या चित्रपटातील वास्तववादी चित्रणाने चित्रपटाला प्रचंड यश मिळालेच आणि ऑस्कर नामांकन मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

शेतीच्या कामांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने शारीरिक कष्ट उपसत आपल्या देशातील शेतकरी कुटुंबातील स्त्री, वर्षानुवर्षे हे चित्र यथार्थ ठरवत असली, तरी परंपरेने तिला दुय्यम श्रेय दिले होते. मात्र शेतीतील स्त्रीच्या श्रमांची, शेती व अन्न उत्पादनातील तिच्या योगदानाची स्वतंत्र दखल आज समाज घेऊ लागला आहे.

महिला : शेतीचा कणा                              

महिलांची कृषी क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. शेतीमधील  नियमित,प्रासंगिक, कष्टाची,किचकट, वेळखाऊ अशी सर्वच प्रकारची कामे त्या करतात.

शेतीतील हंगामपूर्व मशागतीपासून धान्य घरात येईपर्यंत, धान्य साठवणूक, वाळवणी, शेतीपूरक पशुधनाची काळजी घेणे, त्यांचे गोठे साफ करणे, दूध काढणे, त्यांना चारा व पाणी देणे, कोंबड्या शेळ्या-मेंढ्या – पाळणे, त्यांची निगा राखणे, त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनांतून घरातील गरज भागविणे व अधिकच्या उत्पादनाची विक्री करून त्यातून चार पैसे गाठीला बांधणे, सामाजिक वनीकरण, मत्स्यपालन यांसारखी अनेकानेक कामे महिला वर्षानुवर्षे करतात.

ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाही अशा कुटुंबांमधील महिला इतरांच्या शेतात मजुरी करून कुटुंबाला हातभार लावतात. महिला या अन्नधान्याच्या प्राथमिक उत्पादक आहेत, जैवविविधतेच्या संरक्षक आहेत, एकप्रकारे शेतीचा कणा आहेत.                              

शेतीत महिलांचा सहभाग

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात २६.३१ कोटी शेतकरी असून त्यामध्ये २२.७१ कोटी पुरुष आणि ३.६० कोटी महिला आहेत. त्याचबरोबर देशात एकूण १४.४३ कोटी शेतमजूर असून त्यामध्ये ८. २७ कोटी पुरुष आणि ६.१६ कोटी महिला आहेत. २००१ ते २०११ या कालावधीत महिला शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी शेती करणारी, शेतमालाच्या व्यापारविषयीचा निर्णय घेणारी, शेतमजुरी करणारी अशा वेगवेगळ्या भूमिका पेलणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात पुरुष शहरी भागांत स्थलांतर करत असल्यामुळे घरातील महिलेकडे शेतीची जबाबदारी येत असते. काही ठिकाणी शेतकरी नवऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या आणि समाजाच्या विरोधाला तोंड देत अपुऱ्या संसाधनांच्या मदतीने आज कितीतरी एकट्या महिला शेती करत आहेत. कृषी क्षेत्र आज महिलांचे क्षेत्र होत चालले आहे. महिलांना कृषी योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे धोरण शासनानेही अंगीकारले आहे.

शेतजमिनीची मालकी आणि महिला

‘ज्याच्या नावावर सातबारा, तो शेतकरी’, या महसुली नियमामुळे शेतीमध्ये कष्ट करूनही महिलांना शेतकरी म्हणून मान्यता आणि लाभ मिळण्यास अडचणी येत असत.

“१५ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला शेतकरी दिनम्हणून साजरा करण्यात येत असून, शेतीतील महिलांचे योगदान यानिमित्त अधोरेखित करण्यात येते.

जमिनीच्या वारसा हक्कासंदर्भात महिलांना कायदेशीर हक्क असले तरीही, सामाजिक आणि सांस्कृतिक रीतीभातींमुळे बहुतांश महिलांना जमिनीची मालकी नाकारली जात असे. हे लक्षात घेऊन, ‘शेतकरी’ म्हणून दर्जा मिळण्यासाठी शेतजमिनीवर महिलांची नावे असावीत, हा द्रष्टा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य आहे.

१५ सप्टेंबर १९९२ला महसूल आणि वन विभागाने याबाबत परिपत्रक काढले होते. एखाद्या पुरुषाला स्वखुशीने आपल्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये पत्नीच्या नावाची नोंद सह हिस्सेदार म्हणून करायची असेल, तर त्याने विनंती केल्यास तशी नोंद फेरफार उताऱ्यात केली जाते.

जमिनीवर महिलांची मालकी असेल, तर त्या महिलांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा उत्तम राहते. जमिनीचे हक्क महिलांना कुटुंबात पत मिळवून देतात आणि त्या महिलेची समाजातील प्रतिष्ठा वाढते. जमिनीवरील स्वतःच्या मालकीमुळे स्त्रियांच्या हातात वाटाघाटी करण्याचे बळ येते.

शाश्वत विकासात योगदान

शेती सुलभपणे करण्यासाठी संसाधने, सिंचन आणि कर्ज यांचा पुरवठा, मालाची स्थानिक पातळीवर हमीभावाने खरेदी, मालाला बाजारपेठ, शाश्वत शेतीला प्रोत्साहन. संस्थात्मक सुरक्षितता, संसाधनांवर अधिकार आणि शेती व्यवस्थापनातील निर्णयप्रक्रियेमध्ये सहभाग यांसारख्या मुख्य गरजा लक्षात घेऊन, शेती व्यवसायाला आणि महिलांच्या विकासाला पूरक अशा शासकीय योजना आखल्या जात आहेत.

कष्टाने नांगर ओढणारी, आत्मविश्वासाने ट्रॅक्टर चालवणारी अशी महिला शेतकऱ्यांची आश्वासक वाटचाल कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासातील महिलांचे योगदान अधोरेखित करणारी आहे. हे नक्की.

वरील माहितीची  खात्री करणेसाठी :https://rural.nic.in/en/press-release/mahila-kisan-sashaktikaran-pariyojana
Central Government Schemes: केंद्र शासनाच्या योजन;आजच घ्या भरपूर फायदा !

FAQ:

राष्ट्रीय महिला शेतकरी दिन कधी असतो ?

15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.

महिला शेतकऱ्याला काय म्हणतात ?

अशी स्त्री जी स्वत शेती किंवा शेतमजुरी करते.

सर्वात प्रसिद्ध महिला शेतकरी कोण आहे?

सर्वात प्रसिद्ध महिला शेतकरी अमांडा ओवेन – उर्फ ​​यॉर्कशायर शेफर्डेस या आहेत.

Continue Reading More Recent News

gold rate today pune

बापरे..! पुण्यात सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढणार का ? gold rate today pune

ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरोgold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून … Read more

soybean rate

soybean rate: सोयाबीन उसळणार,पहा पुढच्या ३ महिन्याचं सोयाबीनच भविष्य !

नागपूर, 19 ऑक्टोबर 2024 (एग्रीन्यूज 18 प्रतिनिधी) soybean rate: सोयाबीन दरातील सततच्या घसरणीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयामुळे भविष्यात सोयाबीन दरात मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी याबाबत महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. इंदूर: मध्य … Read more

Free Gas Cylinder Yojana

Free Gas Cylinder Yojana: तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवा, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता!

(नवी दिल्ली) – 14 ऑक्टोबर 2024: न्यूज़ डेस्कभारत सरकारने नुकतीच ‘Free Gas Cylinder Yojana’ नावाची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतर्गत, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे आणि महिलांचे सबलीकरण व्हावे, हा उद्देश आहे. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे, तर … Read more

viral video

वासरावर सापाचा अचानक हल्ला, व्हिडिओ व्हायरल, पुढे काय झाले तुम्हीच पहा

दिनांक: ८ ऑक्टोबर २०२४वृत्तसंस्था: स्थानिक वृत्त 1. वासराच्या संकटाची कहाणी 👉🏻व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वासरावर अचानक सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडिओ एका गावातील गोठ्यात चित्रीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये खुंटीला बांधलेल्या दोन वासरांपैकी एकावर साप अचानक फणा पसरून हल्ला … Read more


Join WhatsApp Group WhatsApp